Monday, June 19, 2006

ह... एकंदर कार्यालयातील वातावरण बघून वाटतय की पुढचा आठवडा फारच धावपळीत जाणार. नाही म्हणजे जरी मी IT companyत कामाला असलो तरी जास्त काम म्हंटल की कपाळाला आठ्या या पडतातच. नोकरी लागली की कस जग थांबूनच जात. Collegeमध्ये असतांना कोणी मित्राने फोन केला की बोलायला हजार गोष्टी असायच्या, आता कोणी विचारल 'क्या चल रहा है?" तर माझ आपल standard उत्तर तयार असत, "कुछ नही यार, बस अपना routine job चल रहा है।" शैक्षणिक आयुष्यात जो उत्साह असतो तो एकदा नोकरी चालू झाल्यावर कसा संपूनच जातो. नाहि म्हणायला नोकरीमध्ये पण शिकण्यासारख फार काही असत पण त्या शिकण्यात तशी फारशी मजा येत नाही, अर्थात अस सगळ्यांच्याच बाबतीत होत नसाव. हे माझ्या मनात आल ते म्हणजे आजकाल माझ्या मित्रांचे माझ्याबरोबर जे संवाद होतात त्यामुळे. तो पहिलेचा सहजपणा कसा तो उरलाच नाहीय. बहुतेक संवाद काम, पैसा, career आणि लग्न (वयाचा दोष) या चार गोष्टींभवतीच फिरत राहतात. लग्न हा विषय तसा नुकताच काही महिन्यांपूर्वी आमच्या संवादामध्ये यायला लागला; सर्वथा नवीन हो‍उ घातलेल्या नवरेमंडळींमुळे. सर्वच संवाद तसे गंभीर नसतात; कार्यालयातील निरनिराळ्या मजा, एकाकाचे कार्यालयातील कारनामे ऐकण्याजोगे असतात. आयुष्य कधी आणि कस बदलत हे लक्षात येत नाही. शाळेत असतांना किंवा college मध्ये असतांना अस सतत वाटत रहायच की आयुष्यात काहीतरी नवीन होतय. याउलट गेल्या एक वर्षापासून अस वाटतय की आयुष्य एकाच ठिकाणी थांबलय आणि पुढे सरकायला तयारच नाहीय. सुट्टीच महत्व शाळेपेक्षा नोकरीत जास्त कळत. अल्बर्ट आइनस्टाइनचा एक सुंदर quote आहे, “Life is like riding a bicycle, to keep it balanced you need to keep moving.” आणि माझ्या cycleचा balance जायला लागलाय.
चला जाउद्या थोड काम करायला पाहिजे नाहितर आमची cycle चालणार कशी?

Wednesday, June 07, 2006

भविष्याचा आणि स्वप्नांचा वेध

माणूस सतत भविष्याचा वेध घेत असतो; कधी planning करुन तर कधी ज्योतिष्याच्या मागे लागुन. क्वचितच कोणी एखादा सापडतो, जो पुढे काय होईल असा विचार करत नाहि. प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपर्‍यात काही स्वप्ने दडून बसलेली असतात आणि प्रत्येकजण भविष्यात हि स्वप्ने शोधायचा प्रयत्न करत असतो. मग माणूस हि स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागतो आणि फार कमी लोक त्यात यशस्वी होतात. अर्थात सर्वच स्वप्नांच्या मागे लागतात असेहि नाहि, मात्र जे मागे लागतात त्याच्या तर्‍हा निरनिराळ्या असतात. इकडे मागे लागतात याचा अर्थ, स्वप्न पूर्ण होतील अशी आशा बाळगून राहतात.
काही लोक ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ म्हणत, फक़्त स्वप्नच बघतात आणि आपले आयुष्य आहे तसेच चालु ठेवतात, काहिहि प्रयत्न करत नाहित. काहि रात्रंदिवस आपली स्वप्न खरी करण्याच्या दिशेने झटतात. काहि प्रयत्न करतात पण स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने नाही तर स्वप्न पूर्ण होतील का आणि झाली तर कधी पूर्ण होतील हे शोधण्याच्या द्रुष्टीने. ज्योतिष्याच्या मागे लागणार्‍या लोकांमध्ये या लोकांचे प्रमाण जास्त असत. स्वप्न पडो वा न पडो, भविष्य जाणून घेण्याची इच्छा मात्र जवळ जवळ सर्वांनाच असते.
भविष्य जाणण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न पण फार भारी असतात. कोणी विचारतो मला lottery कधी लागेल, तर कोणी विचारतो मला नोकरी कधी लागेल किंवा बढती कधी मिळेल? of course, हाच प्रश्न आजकालचे IT वाले लोक, मी switch कधी मारणार असा वेगळ्या प्रकारे विचारतात (non-IT लोकासाठी, swith मारण्त म्हणजे नवीन companyत नोकरी लागणे किंवा जुन्या companyत आताच्या companyपेक्षा जास्त पगारावर नोकरी लागणे). तरुण पोरींचे पालक हमखास विचारणार की त्यांच्या मुलीच लग्न कधी होणार? अगदी राजकारणीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पदाप्रमाणे विचारतात की ते मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री कधी होणार वगैरे वगैरे. गरीब असो वा श्रीमंत आपली स्वप्ने पूर्ण होणार की नाही याची उत्सुकता सर्वांनाच असते.
असो सध्या मला ज्योतिषाला एकच प्रश्न विचारायचाय की एकता कपूर नावाच्या एका समाजकंटकीच्या मालिका कधी बंद होणार; माझा roommate या सर्व मालिका बघून मला torture करतोय.