Tuesday, March 16, 2010

कविता नसलेली कविता

कधी कसे काही सुचेना, माझ्या मनात काहीच राहीना.
कोणी म्हणते हे कर, कोणी म्हणते ते कर.
मी करतो जे, ते कुणा चालेना, पण ते केल्याशिवाय मला काही करमेना.
कोण चूक, कोण बरोबर, कोण चूक, कोण बरोबर, मला काही माहित नाही.
मी वेडा कि जग वेडे, तेही काही कळत नाही.
शहाण्यांच्या या जगात, मज वेड्याची हि काय गत?
जाऊदे, म्हंटले मी स्वतःला, कोणाला काय फरक पडतो?
मी माझ्या आयुष्याची दोरी पकडून, लटकत राहायचे कुठल्यातरी खांबाला.
नाही जमत आपल्याला बैलासारखी मान डोलवून वरिष्ठांचे ऐकणे,
नाही जमत आपल्याला मूर्ख रुढींच्या आहारी जाणे,
नाही जमत आपल्याला नसलेल्या देवाच्या शरण जाणे,
नाही जमत आपल्याला पैसे कसे invest करावे,
नाही जमत आपल्याला पोरीला कसे impress करावे,
नाही जमत आपल्याला माहित असलेल्या गोष्टींचा दिखावा करणे,
नाही जमत आपल्याला चांगलेपणाचा दिखावा करणे,
नाही जमत आपल्याला चेहऱ्यावर खोटे भाव दाखवणे,
नाही जमत आपल्याला दिवसभर नावडते काम करून, यशस्वी होण्याचा दावा करणे,
आपण पडलो सरळसोट, दुधाला म्हणालो दुध, पाण्याला म्हणालो पाणी,
कुणी म्हणाले तू गाढव, तर नाही रेकलो आम्ही,
कुणी म्हणाले तू शहाणा, नाही पडलो पाया त्याच्या.
लाज नाही वाटली कधी या सरळपणाची,
लाज नाही वाटली कधी प्रामाणिकपणाची
तरी मनात सल राहते, तरी मनात सल राहते, का आलो या जगावरती,
काय कार्य करिता होईल शाश्वती या वेड्या मनाची,
असेच वेडे वेडे म्हणता का सरून जाणार जीवन?
जरी या शहाण्यांच्या जगात वेडेच बनती महान,
मी कुठला वेडा, महानवाला कि वेडाच राहणारा?