आज भलताच कंटाळा आलाय. डोक्यावरती इतकी कामे असूनही असे वाटतंय कि जणू काही मला काही कामच नाहीय. खर म्हणजे मी आता जितक्या गोष्टींची जबाबदारी माझ्या डोक्यावर घेतलीय, तो एक मूर्खपणाच आहे. त्यातच माझ्या पूर्वीच्या कार्यालयाच्या आठवणी आल्या, आणि तिकडच्या सहकाऱ्यांबरोबर काम करतांना किती मजा यायची ते हि आठवले. अत्यंत चांगला boss असला कि किती फरक पडतो ते आता कळले. मी फारच नशीबवान होतो त्या समूहात काम करायला. फारच कवचित असे होते, कि तुम्हाला एकाच समुदायात एवढी सगळी चांगली लोक भेटतात. शेवटी एका पूर्वीच्या सहकाऱ्याबरोबर कार्यालयाचा messenger वापरून बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. दिवस थोडासा कामी लागल्यासारखा वाटला. नाहीतर तेच रद्दड routine.
अस वाटते कि कुठेतरी आपण काहीतरी चुकतोय पण बरोबर काय तेच कळत नाही. कधीतरी बरोबर काय ते कळूनही ते करायची हिंमत अंगात येत नाही. पण मी हे काय बोलतोय? मला वाटते मी नेहमी प्रमाणे भरकटलो, असुद्या चालायचच.