Tuesday, May 16, 2006

विचारांच्या भ्रमंतीत

काहि लोक बोलून मग विचार करतात तर काहि विचार करतात आणि मग बोलतात. मी फार विचार करुन फार कमी बोलणार्‍या लोकांमधला. या सवयीचे जसे फायदे आहेत तसे तोटेहि भरपूर आहेत. कोणि काही अचानकपणे मला अनपेक्षित प्रश्‍न विचारला तर फारच गोची होते. मग अचानक मी हुशार निखील मधून मठ्ठ निखील मध्ये परीवर्तीत होतो. आज असाच एक प्रसंग झाला, मी माझ्या कार्यालयातील एका सहकारी बरोबर कार्यालयातील काही कामाबद्‍दल बोलत होतो आणि माझ्या संगणकावरील ब्लॉगरची window बघून तीने मी ब्लॉग लिहतो का अस विचारल. आता हा साधा, सरळ, सोप्पा प्रश्‍न, पण मी दोन मिनिट काहि बोलूच शकलो नाही; त्यानंतर हळूच हो म्हंटले. तीने प्रश्‍न विचारल्याबरोबर माझे विचार सुरु झाले, माझ्या इंग्रजी ब्लॉगवर मी माझ्या कार्यालयातील लोकांबद्‍दल बरच काही लिहलय, ते मी share करु शकतो का? मग मी कार्यालयाबद्‍दल काय काय लिहलय? वगैरे वगैरे. (ती अमराठी त्यामुळे तिच्याशी इंग्रजी ब्लॉगच share करावा लागणार.) एवढया सगळ्या विचारात तीने माझ्या ब्लॉगची link विचारली आणि मी काहि ती दिली नाही.
विचारांच्या भ्रमंतीत माझ्यासारखी माणस कधी हरवतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. मला कधी कधी फार अप्रूप वाटत की बाकी सगळे विचार आणि बोलण यांचा मेळ कसा साधतात. हि एक गोष्ट मला शिकायची आहे. विचारांची हि देवाने दिलेली देणगी मला लाभलीय खरी पण तिचा व्यवस्थितपणे वापर करावा हे मात्र पूर्णपणे उमगलेले नाही, आणि मलाच नाही तर बर्‍याच लोकांना ही गोष्ट उमगत नाही.

No comments: