माणूस सतत भविष्याचा वेध घेत असतो; कधी planning करुन तर कधी ज्योतिष्याच्या मागे लागुन. क्वचितच कोणी एखादा सापडतो, जो पुढे काय होईल असा विचार करत नाहि. प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपर्यात काही स्वप्ने दडून बसलेली असतात आणि प्रत्येकजण भविष्यात हि स्वप्ने शोधायचा प्रयत्न करत असतो. मग माणूस हि स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागतो आणि फार कमी लोक त्यात यशस्वी होतात. अर्थात सर्वच स्वप्नांच्या मागे लागतात असेहि नाहि, मात्र जे मागे लागतात त्याच्या तर्हा निरनिराळ्या असतात. इकडे मागे लागतात याचा अर्थ, स्वप्न पूर्ण होतील अशी आशा बाळगून राहतात.
काही लोक ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ म्हणत, फक़्त स्वप्नच बघतात आणि आपले आयुष्य आहे तसेच चालु ठेवतात, काहिहि प्रयत्न करत नाहित. काहि रात्रंदिवस आपली स्वप्न खरी करण्याच्या दिशेने झटतात. काहि प्रयत्न करतात पण स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने नाही तर स्वप्न पूर्ण होतील का आणि झाली तर कधी पूर्ण होतील हे शोधण्याच्या द्रुष्टीने. ज्योतिष्याच्या मागे लागणार्या लोकांमध्ये या लोकांचे प्रमाण जास्त असत. स्वप्न पडो वा न पडो, भविष्य जाणून घेण्याची इच्छा मात्र जवळ जवळ सर्वांनाच असते.
भविष्य जाणण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न पण फार भारी असतात. कोणी विचारतो मला lottery कधी लागेल, तर कोणी विचारतो मला नोकरी कधी लागेल किंवा बढती कधी मिळेल? of course, हाच प्रश्न आजकालचे IT वाले लोक, मी switch कधी मारणार असा वेगळ्या प्रकारे विचारतात (non-IT लोकासाठी, swith मारण्त म्हणजे नवीन companyत नोकरी लागणे किंवा जुन्या companyत आताच्या companyपेक्षा जास्त पगारावर नोकरी लागणे). तरुण पोरींचे पालक हमखास विचारणार की त्यांच्या मुलीच लग्न कधी होणार? अगदी राजकारणीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पदाप्रमाणे विचारतात की ते मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री कधी होणार वगैरे वगैरे. गरीब असो वा श्रीमंत आपली स्वप्ने पूर्ण होणार की नाही याची उत्सुकता सर्वांनाच असते.
असो सध्या मला ज्योतिषाला एकच प्रश्न विचारायचाय की एकता कपूर नावाच्या एका समाजकंटकीच्या मालिका कधी बंद होणार; माझा roommate या सर्व मालिका बघून मला torture करतोय.
Wednesday, June 07, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
KALAJI KARU NAKOS.KADHITARI BANDA HOTILACH.
Nice blog!
If you get a chance, check out my site: Pick 3 Turbo Player
Thanks
Post a Comment